Published August 10, 2022 | Version v1
Journal article Open

कामगार शेतकरी समाजजीवन आणि अण्णा भाऊ साठे यांची शाहिरी

Description

महाराष्ट्रात गोंधळी, भराडे, दांगट, वासुदेव, पांगुळ यासारखे पारंपरिक रुढी परंपरांचे जतन करणारे लोककलावंत गाणे बजावणे करत होते. तत्कालीन विरश्रींचा पराक्रम, विलास, समाजजीवन, धार्मिक विधी परंपरा यांच्यातून शाहिरी काव्यास स्फूर्ती चढू लागली होती. यातूनच पुढे  शाहिरी वाङ्‌मय विकसीत झाले आहे. मराठ्यांच्या जीवनाचे, भावभावनांचे अस्सल रसभरीत चित्रण करणे हेच पुढे शाहिरांचे जीवित कार्य झाले. त्यामुळे शाहिरांना लौकिक प्रवृत्तीचे कलावंत मानले जाते. मानवाचे जीवन त्यातील सत्य, गुण-दोष, वृत्ती-प्रवृत्तींवर भाष्य शाहिरी वाङ्‌मयाने केले आहे. वाङ्‌मय म्हणून आवश्यक असणारे सर्व गुणविशेष या वाङ्‌मयात आहेत. त्यामुळे एकूण मराठी वाङ्‌मयात शाहिरी वाङ्‌मयाचे स्थान अनन्यसाधारण असे आहे.

Files

0906119.pdf

Files (469.9 kB)

Name Size Download all
md5:382d0f5e1c2779b60ae0274d0bf0c377
469.9 kB Preview Download