जागतिकीकरण आणि भारतीय अर्थव्यवस्थेतील तीन क्षेत्रे
Authors/Creators
- 1. सहाय्यक प्राध्यापक, अर्थशास्त्र विभाग.स. ब. खाडे महाविद्यालय, कोपार्डे ता. करवीर, जि. कोल्हापूर
Contributors
Editor:
Description
गोषवारा -
जागतिकीकरण ही एक सर्वांगीण प्रक्रिया असून, ती फक्त व्यापारासाठी मर्यादित नाही. जागतिकीकरणाने भारतातील नव्हे, तर जगातील सर्व क्षेत्रावर प्रभाव पडलेला आहे. जगातील विविध देशांना आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांवरील सर्व नियंत्रणे दूर करून भांडवल व इतर प्रकारच्या उत्पादक घटकांची गतिक्षमता वाढविणे म्हणजे जागतिकीकरण होय. भारतात सन 1991 नंतर उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण या धोरणांमुळे मुक्त अर्थव्यवस्थेची वाट मोकळी झाली. परिणामी शेती, उद्योग आणि सेवा ही अर्थव्यवस्थेची तीन प्रमुख क्षेत्रे जागतिक स्तराची थेट जोडली गेली. या तिन्ही क्षेत्रांमध्ये अनेक चांगल्या संधीसोबत कित्येक आव्हाने निर्माण झाली. शेती क्षेत्रामध्ये आधुनिक उत्पादन तंत्राच्या सहाय्याने रोजगार निर्मिती, निर्यातीत वाढ, उत्पादनात वाढ असे फायदे झाले. परंतु, शेतीतील अनुदानात घट, छोट्या शेतकऱ्यांवरील दबाव, किमतीतील अस्थिरता या समस्या निर्माण झाल्या. उद्योग क्षेत्रामध्येही उत्पादन तंत्रात बदल झाल्याने दर्जेदार वस्तूंचे उत्पादन झाले. तसेच परकीय गुंतवणूक वाढली, बाजारपेठेचा विस्तार झाला. पण त्याचबरोबर मोठी तीव्र स्पर्धा, परकीयांचे भारतीय बाजारपेठांवरील वाढते वर्चस्व या आव्हानांचाही स्वीकार करावा लागत आहे. सेवा क्षेत्रही यापासून दूर नाही. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रवेशामुळे ग्राहकांना सेवेचे अनेक पर्याय आधुनिक तंत्रज्ञानाच्या व अनेक कौशल्याच्या आधारे उपलब्ध झाले. त्याच्याच जोडीला भारतीय सेवा व्यवसायांना परकीय मक्तेदारीलाही सामोरे जावे लागत आहे. थोडक्यात जागतिकीकरणामुळे भारतीय अर्थव्यवस्था आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धात्मक बनली असली, तरी तीव्र आव्हानांचा सामना करत आहे. परंतु, जागतिकीकरण हे अपरिहार्य आहे त्यामुळे अनेक उपायांचा अवलंब करून ते शाश्वत आणि संतुलित बनवणे गरजेचे आहे.
Files
x23.pdf
Files
(440.5 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:881a646cadb75f4ccb61f586875eebac
|
440.5 kB | Preview Download |