महात्मा गांधींचे आर्थिक आणि सामाजिक विचार
Authors/Creators
- 1. विभाग प्रमुख, अर्थशास्त्र विभाग, सरस्वती संगीत कला महाविद्यालय, लातूर ४१३५३२ महाराष्ट्र, भारत
Description
आपल्या भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या व्यक्तीमध्ये ज्यांचे नावअतिशयगौरवाने घेतले जाते,तेनावम्हणजे "मोहनदास करमचंद गांधी" ज्यांना आपला देशचनव्हेतरसंपूर्ण विश्व 'महात्मा' 'राष्ट्रपिता' अशासंबोधनांनी ओळखतो. महात्मा गांधींच्या जीवनचरित्राचा वेगळा परिचयकरूनदेण्याची गरज नाही. कारणत्यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदानच सर्वश्रुत असूनसत्य, अहिंसा आणि स्वावलंबन यातून त्यांनी सर्व भारतीयांना देशभक्तीचे मूर्तिमंत उदाहरण दाखवून दिले. आणि याचसत्याच्या मार्गाचा अवलंबकरूनभारताला पारतंत्र्यातून मुक्तकरूनस्वातंत्र्य प्राप्त करूनदिले.
आपल्या भारत देशामध्ये आधुनिक आर्थिक विचारांची सुरुवात 19 व्याशतकापासून झालेली दिसूनयेते. 19 व्याशतकामध्ये ब्रिटिशांचे आगमनभारतामध्ये झाली होते .ब्रिटिशांनी भारतीय अर्थव्यवस्थेची आर्थिक लूटकरण्याचे धोरण राबविले होते. भारतीयांवर प्रचंड अन्याय होतहोता, तसेचशोषणहोतहोते, याजुलमीशोषणकरणाऱ्या ब्रिटिशाविरुद्ध ज्याभारतीयांच्या प्रतिक्रिया होत्या त्या प्रतिक्रिया म्हणजे आधुनिक काळातील भारतीय अर्थशास्त्रीय विचारहोते. यातप्रामुख्याने दादाभाई नौरोजी, महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, पंडितजवाहरलाल नेहरू, महादेव रानडे, गोपाळकृष्ण गोखले, इत्यादींचे नाव घेतायेतील. याचभारतीय आधुनिक आर्थिक विचारवंतातील प्रमुख नाव म्हणजेच महात्मा गांधीहोय. महात्मा गांधी यांनीभारतीय स्वातंत्र्यलढ्यामध्ये सत्य, अहिंसा आणि स्वावलंबन या त्रिसुत्रीच्य विचारावरुन इंग्रजांना शह दिला.
भारताच्या आर्थिक विचारांमध्ये किंवा आर्थिक विचारवंतांमध्ये महात्मा गांधींचे स्थानकोणते? हाजेव्हां प्रश्न पडतोतेव्हा गांधीजी एकाअर्थाने अर्थशास्त्रज्ञ नव्हते, किंवात्यांनी अर्थशास्त्राच्या बाबतस्वतंत्र ग्रंथही लिहिला नाही. महात्मा गांधींनी धर्म, राजकारण, समाजकारण, देशभक्ती किंवा एकूणचजीवनाचे जे तत्त्वज्ञान मांडले त्यातच त्यांचे प्रमुख आर्थिक विचारविखुरलेले दिसून येतात. त्याविखुरलेल्या आर्थिक विचारांना एकत्रित करण्याचे काम त्यांच्या अनेक अनुयायानी केले. महात्मा गांधींच्या दृष्टीने अर्थशास्त्र हे वेगळीनसूनजीवनाच्या क्रमाचा वतत्त्वज्ञानाचाच एक भागआहे. अर्थशास्त्र आणि नितीशास्त्र यांची फारकतकरणेत्यांना मान्य नव्हते. किंवात्यांच्यामते नैतिक जीवनाचा प्रभाव मानवाच्या आर्थिक जीवनावर असायला हवा. पाश्चात्यांच्या प्रणालीतील भौतिकवादाचा अतिरेक अयोग्य असून महात्मा गांधीजींच्या दृष्टीने व्यवहारिक शास्त्राला नैतिक मूल्याची जोड दिल्याशिवाय व्यक्तीचे वराष्ट्राचे कल्याण होऊशकतनाही. म्हणजेच भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधींनी जे विचारव्यक्त केले, जे लेखनकेले, तेचत्यांचे आर्थिक विचारआहेत. त्यांच्या विचाराला राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व आर्थिक आशय आहे. महात्मा गांधींच्या आर्थिक विचारांचे अध्ययन करण्यासाठी महात्मा गांधींनी मांडलेल्या अनेक संकल्पनेपैकी कांही महत्त्वाच्या आर्थिक संकल्पनांचा, आढावाघेऊनत्यांच्या आर्थिक विचारांचा मागवा प्रस्तुत संशोधन लेखातून घेण्यात आलेलाआहे.
Files
20230104559565142.pdf
Files
(847.6 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:d7b684c70f7c103287971ca155c92c0f
|
847.6 kB | Preview Download |