Published June 30, 2022 | Version v1
Journal article Open

विधवांच्या उन्नतीसाठी समाज सुधारकांचे योगदान

Description

१९ व्या शतकात भारतीय समाजात सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण परिवर्तने घडून आली. याच काळात भारतीय समाजात स्त्रियांची स्थिती दयनीय होती. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाकारण्यात आला. आर्थिक निर्णयापासून त्यांना वंचित ठेवले गेले. त्यांना समाजात व कुटुंबात कोणत्याही प्रकारची प्रतिष्ठा नव्हती. भारतीय समाजातील स्त्रिया या अस्पृश्यता, बालविवाह, जरठ बाला विवाह, सतीप्रथा, केशवपन, विधवा पुनर्विवाह बंदी, अकाली वैधव्य अशा अनिष्ठ रूढी व जाचक प्रथा-परंपराच्या विळख्यात अडकल्या गेल्या होत्या. थोडक्यात भारतीय समाजात स्त्रियांना गुलामगिरीचे आयुष्य जगावे लागत होते. इतर स्त्रियांच्या तुलनेत विधवा स्त्रियांची स्थिती अतिशय हलाखीची व दयनीय होती. फार मोठ्या प्रमाणात त्यांना शोषणाला बळी पडावे लागले. अशा गुलामगिरीत अडकलेल्या स्त्रियांना मुक्त करण्यासाठी व विशेषत: विधवांच्या उन्न्तीसाठी भारतातील समाज सुधारकांनी दिलेले योगदान अतिशय महत्त्वपूर्ण आहे.

 

Files

31. Prof. Kiran Survase.pdf

Files (1.1 MB)

Name Size Download all
md5:a6a3bb93ed5b16dda3d0a7c118514bcc
1.1 MB Preview Download